आमच्या विषयी
राम कृष्ण हरि
श्री दत्त योगीराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्मप्रसार करून आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी कार्य हाती घेऊन वारकरी व शालेय शिक्षण एकाच छताखाली शिक्षण देणारी संस्था.
१. स्थापना दि.८ सप्टेंबर २००८ ………
महाराष्ट्रात सुमारे 100 पेक्षा जास्त गोशाळेचे पालकत्व स्वीकारणारे आदरणीय गुरुवर्य रामायणाचार्य संजयजी पाचपोर महाराज , प.पू.गुरुवर्य साई सच्चिदानंद सरस्वती स्वामी ओंकारेश्वर , आंतरराष्ट्रीय ज्योतिष विशारद प.पु.अनिल महाराज जोशी नाशिक, प.पु. ह.भ.प. देवगोपालजी शास्त्री खानदेश, नामधारक ह.भ.प.आसाराम महाराज पडोळे व संतस्वरुप कर्मवीर दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील,ह.भ.प.रामदास आप्पा काळे चंदन नगर यांच्या आशीर्वादाने व असंख्य भाविकांच्या सहयोगाने ह.भ.प.रामायणाचार्य रविंद्रनाथजी महाराज सुद्रिक पाटील यांनी या संस्थेची स्थापना केली.
२. श्रद्धास्थाने
आदरणीय गुरुवर्य अनिल महाराज बेलापूरकर देवास मध्य प्रदेश, मा.अॅड.हनुमंतरावजी थोरवे साहेब, मा.श्री.विठ्ठलराव वाडगे साहेब चेअरमन वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा,श्री.सुरेशजी माने साहेब ( पी.एस.आय. ), सेवावर्धिनी संस्था पुणे, सेवा सहयोग संस्था पुणे,मेळघाट सपोर्ट ग्रुप पुणे, ही संस्थेची श्रद्धास्थाने आहेत. हिंदु धर्मातील सर्व देवता, थोर विचारवंत, धर्मग्रंथ, तीर्थस्थळे, वारकरी संप्रदाय आणि संतमहंत यांच्याविषयी ‘ संस्था’ पूज्यभाव बाळगते. संस्थेने भूतकाळामध्ये केलेले कार्य व भविष्यकाळात करावयाची काही महत्त्वपूर्ण कामे या विषयी अधिक माहिती वाचा…
३. उद्देश
अ. ) विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्माची आवड निर्माण करणे व संत परंपरेचे वारकरी शिक्षण देणे.
आ.) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील, तळागाळातील शालेय शिक्षण व वारकरी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या गोरगरीब अनाथ विद्यार्थ्यांना वारकरी व शालेय शिक्षण देऊन वैयक्तिक साधनेविषयी मार्गदर्शन करून ईश्वरप्राप्तीपर्यंतची वाट दाखवणे.
इ.) आध्यात्मिक ज्ञान आणि त्यातील निष्कर्षाद्वारे अध्यात्माचे महत्त्व सिद्ध करणे.
ई.) मागासलेल्या दुर्गम भागातील व अनाथ, गोरगरीब परीवारातील विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय व अध्यात्माची संपूर्ण माहिती देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे.
उ.) समाज प्रबोधन, राष्ट्ररक्षण, आणि धर्मजागृती, यांद्वारे सर्वचदृष्ट्या आदर्श असलेले धर्माधिष्ठित कार्यप्रणाली विकसित करुन संत महंतांची परंपरा जपणे.
🙏 संस्थेची वैशिष्ट्ये 🙏
१.) महाराष्ट्रातील विविध जाती-धर्मातील गोरगरीब पीडित,अनाथ शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुला-मुलींना मुख्य प्रवाहात आणून त्यांना शालेय शिक्षण व वारकरी शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणे.
२.) वारकरी संप्रदायाचा व्यापक दृष्टीकोन उराशी बाळगून थोर विचारवंतांनी समाजाला दिलेल्या प्रेरणेची शिकवण देणे.
३. )‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या तत्त्वानुसार प्रत्येकाला आवश्यकता आणि क्षमतेनुसार संत परंपरा व वारकरी शिक्षण या साधनांविषयक मार्गदर्शन.
४.) समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांना फाटा देऊन ईश्वरप्राप्तीसाठी सर्व योगमार्गांना सामावून घेणार्या ‘संत गुरु कृपायोग’ या योग्य मार्गानुसार साधना .
५.) वैयक्तिक साधनेबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी स्व परिवारासाठी करावयाच्या साधनेची शिकवण .
संस्थेची स्थापना २००८ करून संत महंतांची परंपरा व धर्मजागृती व प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ आत्मसात करून मानवी जीवन कृतार्थ करण्याचा हेतू संस्थेचा आहे.
अध्यात्माच्या प्रायोगिक स्तरावरील लेखांचा यात अंतर्भाव करण्यात आला असून धर्मशिक्षण, सण,वार व्रते, उत्सव, काळानुसार योग्य साधनेचे महत्त्व, आध्यात्मिक शिक्षण व संत महंतांची परंपरा आणि त्याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनातील न्यूनगंड दूर करून त्यांना मुख्य वारकरी सांप्रदाय प्रवाहात आणून त्यांचे भावी आयुष्य उज्वल करणे.
उ. ) समाजात सलोख्याचे आणि सामंजस्याचे वातावरण निर्माण करून भावी तरुण पिढीस योग्य वेळी मार्गदर्शन करून त्यांना वारकरी संप्रदाय व संत परंपरा याचबरोबर शालेय व शारीरिक शिक्षण देऊन अनाथ गोरगरीब परीवारातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते बदल घडवून त्यांचे भावी जीवन सुखी करण्याचा उद्देश आहे.
ऊ.) दुर्गम भागातील पालकांना व विद्यार्थ्यांना वारकरी व शालेय शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो परंतु या सर्वच अडचणीवर मात करून भागवत धर्माची भगवी पताका महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा संघर्ष संस्था करत आहे. जागतिक कोरोना महामारी सारख्या आपत्तींना तोंड देत असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागला,परंतु उदार अंतःकरणवादी दाते सर्व संस्थाहितचिंतकांच्या बळावर न डगमगता आम्ही या दुर्गम भागामध्ये राहून संस्थेचा नावलौकिक कायम राखला. जागतिक कोरोना महामारी सारख्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थी व स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हान समोर उभे होते. आपत्कालीन परिस्थितीत दळणवळण तुटल्यामुळे मानसिक त्रास झाला.देणगीदारांबरोबर संपर्क साधणे आणि समाजात जाणे कठीण होते. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक समस्येला तोंड देत खडतर प्रसंगावर सुद्धा मात करून आज सक्षमपणे संस्था उभी आहे
क.) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वारकरी शिक्षणामध्ये कीर्तन,प्रवचन, गायन, वादन, भागवत कथा, रामायण कथा, हरिपाठ ,भगवद्गीता पाठ, संस्कृत पाठ, संस्कृत व्याकरण,मराठी व्याकरण हे सर्व शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना परमार्थिक क्षेत्रामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे…
ख.) शालेय शिक्षण देत असताना गोरगरीब विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये स्वयंरोजगार निर्माण व्हावा यासाठी संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान देत विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग कॉम्प्युटर कोर्स यासाठी सुसज्ज कॉम्प्युटर रूम तयार करून या ठिकाणी संगणक संच उपलब्ध करून दिले आहेत.त्यासाठी कार्यतत्पर अशा शिक्षक वर्गाची सुद्धा नियुक्ती केली आहे…
ग.) संस्थेची महत्त्वपूर्ण जडणघडण होत असताना मुलींना वारकरी शिक्षणाबरोबर ई लर्निंग व मशीन शिलाई क्लास देऊन त्यांना सुद्धा आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वयंरोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध करून दिले आहे…
घ.) यापुढील काळामध्ये सर्व समाजातील विधवा महिला व परित्यक्ता महिला यांच्यासाठी कुटीर उद्योगाच्या माध्यमातून शिलाई मशीन कोर्स, एम्ब्रॉयडरी कोर्स ,पापड, लोणचे ,मिरची मसाला अनेक उद्योग व्यवसाय निर्माण करून देणे .
च.) विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण व ई लर्निंग शिक्षण याचबरोबर तंत्रनिकेतनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयटीआय कोर्स मोटर मेकॅनिकल मोटर वायडिंग वायरमन फिटर असे अनेक उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे.
छ.) समाजातील विधवा व परित्यक्ता महिलांचे पुनर्विवाह हा महत्त्वपूर्ण उद्देश समोर ठेवून त्यांचं भावी आयुष्य त्यांच्या परिवाराचे झालेले खच्चीकरण यातून सर्वांनाच सुटकेचा विश्वास मिळावा या दृष्टिकोनातून संस्था प्रयत्नवादी आहे.
झ.) संस्थेच्या माध्यमातून संत महंतांच्या कृपाशीर्वादाने श्री रुक्मिणी माता गोशाळेची स्थापना करून गो हत्या बंदीसाठी महत्त्वपूर्ण उचललेले हे एक पाऊल आहे. या गोशाळेमध्ये 260 गाई वासरे आहेत. यातील बहुतांश गोधन हे कत्तलखान्याकडे जात असताना कर्जत जामखेड श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांच्या तत्परतेने बरेच गोमातांना जीवदान मिळाले आहे. परंतु त्यांच्या पालन पोषणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी श्री रुक्मिणी माता गोशाळेवर आहे ही जबाबदारी पार पाडत असताना सुद्रिक पाटील परिवार प्रयत्नांची पराकाष्टा करून गोशाळा व वारकरी गुरुकुल (अनाथ आश्रम) चालवत आहे.यामध्ये काही उदार अंतःकरणवादी देणगीदारांचाही महत्त्वपूर्ण सहभाग आहे….
बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेचा प्रवास २०१४ पासून सुरू झाला