धार्मिक कार्यक्रम
१ आश्रमावर गुरुवार,रविवार, एकादशी,पौर्णिमा व नैमित्तिक सण वार उत्सव साजरे केले जातात या निमित्ताने
कीर्तन भजन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अन्नदानाचे नियोजन केले जाते दर पौर्णिमेला खूप मोठ्या प्रमाणात समाज आश्रमावर येतो
२ मे महिन्यात गावोगावी अध्यात्मिक व वारकरी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी अध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते
३ वारकरी परंपरा जपण्यासाठी आळंदी, पैठण, पंढरपूर, पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते असंख्य भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी होतात
४ पवित्र तीर्थक्षेत्रावर तसेच गावोगावी समाजाची अध्यात्मिक उन्नती होण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते या माध्यमातून अन्नदान व ज्ञानदान केले जाते
५ आश्रमाचे वतीने तीर्थयात्रेचे आयोजन करून भाविकांना दर्शन घडवून दिले जाते….
